आपला जिल्हा

*गावकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून दिली जाईल*

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

*विरोधीपक्षनेते अजित पवार यांची ग्वाही*

*भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथील शेतीची पाहणी*

चंद्रपूर : मागील १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मागील दोन वेळा पूरपरिस्थिती उद्भवली होती. शेतकऱ्यांच्या शेती देखील पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांसोबत उभे राहण्याचे आदेश विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिल्या. पिपरीसह अनेक गाव अतिवृष्टीमुळे तीन दिवस पाण्यानं वेढले गेले होते. याठिकाणी भेटीदरम्यान पिपरी (देश) येथील ग्रामस्थांनी त्यांच्या अडीअडचणी मांडल्या. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून दिली जाईल, याची ग्वाही दिली.

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, उपविभागीय अधिकारी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नेपाणी, तहसीलदार सोनवणे, कृषी अधिकारी जाधव, तालुका अध्यक्ष सुरज गावंडे, बाळू चिंचोळकर, प्रमोद नागोसे, प्रवीण काकडे, बसंत सिंग यांची उपस्थिती होती.

परिसरात पूरस्थितीनं ओढ्याचं पाणी घरात शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत अजित पवार यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्यांवर बॅरेजेस बांधण्याची मागणी केली. या बॅरेजेसमुळे चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या तीन जिल्ह्यातील शेती ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांना दुबारपेरणी घेण्यासाठी सोईचे होणार आहे. त्याकरिता हि मागणी त्वरित मार्गी लावण्याची विनंती यावेळी खासदार धानोरकर यांनी पवारांकडे केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker