महानगरात निघणार संविधान सन्मान बाइक रॅली
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
बळीराज धोटे, ॲड. बेग यांची पत्रकार परिषदेत माहिती
चंद्रपूर : देशात २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधन सभेने भारतीय संविधान मंजूर केले. तर २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे २६ जानेवारी रोजी गणराज्य दिन साजरा केला जातो. परंतु, २६ जानेवारी गणराज्य दिनाचे महत्त्व जनतेला कळावे, संविधानाविषयी जनजागृती व्हावी या हेतूने शुक्रवार २६ जानेवारी रोजी महानगरातून संविधान सन्मान बाइक रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती संविधान सन्मान बाइक रॅली आयोजन समितीचे समन्वयक बळीराज धोटे, ॲड. फरहाद बेग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२६ जानेवारी हा खऱ्या अर्थाने मुक्तीदिन आहे. संविधानाने येथील वंचित, मागासवर्गीयांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी २६ जानेवारी घरात दिवे प्रज्वलित करावे, घरावर रोषणाई हा उत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले. सकाळी १० वाजता गांधी चौक येथून या बाइक रॅलीला प्रारंभ होणार आहे. यानंतर जटपुरा गेट, वरोरा नाका, नागपूर रोड गजानन मंदिर चौक, वरोरा नाका उड्डाणपूल, मातोश्री विद्यालय चौक, गुरुद्वारा रोडतुकूम व्हाया आदर्श पेट्रोल पंप, एमइएल चौक येथून फिरून प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेटमार्गे अंचलेश्वर गेट, बागला चौक, शिवाजी चौक, भानापेठमार्गे परत गांधी चौकात ही बाइक रॅली पोहोचणार आहे. या बाइक रॅलीत चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बळीराज धोटे, ॲड. फरहाद बेेग यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला उमाकांत धांडे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्रा. नामदेव कन्नाके, संजय खोब्रागडे, इंजि. अशोक मस्के, इंजि. सूर्यभान झाडे, डॉ. सोमकुवर, भाष्कर मून आदी उपस्थित होते.