आपला जिल्हा

‘बीआरएस’चा १६ डिसेंबर रोजी विधानभवनावर बैलबंडी मोर्चा

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

जिवतीतून होणारा मोर्चा प्रारंभ : भूषण फुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

चंद्रपूर : जिल्ह्यातील वनजमिनीवर अतिक्रमित शेतकऱ्यांना पट्टे देण्याच्या मागणीसह अन्य विविध समस्यांकडे राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने १६ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार असून, १२ डिसेंबर रोजी जिवती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या बैलबंडी मोर्चाला प्रारंभ होणार असल्याची माहिती बीआरएसचे भूषण फुसे यांनी शुक्रवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अतिवृष्टीमुळे सुरुवातीला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही मदत अद्यापही मिळाली नसताना अवकाळीने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, रानटी डुकरांचा बंदोबस्त करणे, अन्यथा डुकरांची नसबंदी वनविभागाने करावी यासाठी शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणे, प्रकल्पग्रस्तांना न्याय देणे, जिल्ह्यातील जुगाराचे अड्डे बंद करणे, भूमिपुत्रांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देणे, वाघांचा बंदोबस्त करणे आदी मागण्या या मोर्चादरम्यान शासनाकडे मांडणार असल्याचे फुसे यांनी सांगितले.

जिवती येथून १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मोर्चाला प्रारंभ होईल. तर राजुरा येथे मुक्कामी राहणार असून, १३ डिसेंबर भद्रावती येथे मुक्काम, १४ डिसेंबर रोजी खांबाडा येथे मुक्काम, १५ डिसेंबर रोजी बुटीबोरी येथे मुक्काम आणि १६ डिसेंबर रोजी दुपारी १२ विधानभवनावर धडक असे मोर्चाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राकेश चिलकुलवार, सनी रेड्डी, सुबोध चिकटे, महेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker