आपला जिल्हा
पुरस्थितीमुळे राजुरा मार्ग बंद झाल्याने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे राजुरा मार्ग बंद झाल्याने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बल्लारपूर येथील जनता शाळेत आश्रय घेतलेल्या पुरग्रस्तांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. पुरात अडकून पडलेल्या ट्रक चालक व बस प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या निर्भय ट्रान्सपोर्ट व बामणी फाट्यावरील नागरिकांचे सामाजिक कार्याबद्दल अहीर यांनी कौतुक केले. याप्रसंगी भाजपा नेते खुशाल बोन्डे, हरीश शर्मा, काशी सिंग, निलेश खरबडे, राजू घरोटे, जुम्मन रिझवी, रामेश्वर पासवान, राजू दारी, रवींद्र वाटकर, राजकुमार, विकास दुपारे व आदि उपस्थित होते.