जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची महसूल अधिकाऱ्यांकडून पायमल्ली
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
विनोद खोब्रागडे यांचा आरोप
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील सर्वे क्रमांक ३ क्षेत्र २.९२ हे.आर जमिनीवरून दोन कुटुंबात वाद आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने १९९३ मध्ये मलकू मोतीरीाम येडमे यांच्या नावाने आदेश पारीत करून वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे आदेश महसूल अधिकारी यांना दिले होते. पंरतु, महसूल अधिकाऱ्यांनी मागील ३४ वर्षांत मोक्यावर कोणतीही चौकशी केली नाही. राजुरा तहसीलदारांनी २००५ मध्ये रजिस्टर्ड दस्त क्रमांक २००५मध्ये विक्री करून दिलेली असताना आणि सातबारावर मलकू येडमे यांचे नाव चढले असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ते खारीज केले. त्यामुळे श्यामराव मेश्राम यांनी नियमबाह्य ताबा घेतला. मोठा वाद उद्भून एका व्यक्तीचा जीवही गेला आहे. तर मलकू येडमे यांचे कुटुंब १४ वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. याला महसूल अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप विनोद खोब्रागडे आणि मलकू येडमे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मलकू येडमे यांना वडिलापासून कुळकायद्यांतर्गत बोरी नवेगाव येथे जमीन मिळाली असून, जमिनीच्या मालकी हक्कासाठी त्यांनी पैसेही भरले आहे. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने २० जुलै १९९३ रोजी रिव्हीजन क्रमांक १०/१९९३ मध्ये आदेश पारीत करून मलकू येडमे यांच्या नावाने मालकी हक्क ताबा दिला आहे. तहसीलदार यांनी २००६मध्ये रजिस्टर्ड विक्री करून दिले आणि सातबारावर नोंदणी केली. यानंतर परत महसूल अधिकाऱ्यांनी या जमिनीचा ताबा श्रीपाद गोविंदराव देशपांडे यांच्या नावे करून सातबारा दिला आहे. त्यामुळे मलकू येडमे यांच्या भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे येडमे यांचे कुटुंबीय शिक्षा भोगत असताना दुसरीकडे त्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे. हा गंभीर प्रकार असून, येडमे यांच्यावर अन्याय करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विनोद खोब्रागडे यांनी केली आहे. ही जमीन परत मिळविण्यासाठी मलकू येडमे यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.