पर्यावरण वाचविण्याच्या नादात वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी,मात्र नागरिकांचे काय? राजू झोडे यांचा वनमंत्र्यांना सवाल
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
संपूर्ण भारतात आज सोमवारी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा होत आहे. मात्र पर्यावरण वाचविण्याच्या नादात वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा दिवसेंदिवस बळी जात असून वाघाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागातर्फ कोणतेही ठोस पावले किंवा उपाययोजना करण्यात येत नाही. यात मात्र नागरिकांच्या जीवाचे काय? असा प्रश्न चंद्रपुर येथील उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी वनमंत्री तथा चंद्रपुर चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील बहुतांश जंगल हे ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प लगत आहे. ताडोबात सध्या 800 च्या वर वाघ असून इतर वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे.यात अस्वल बिबट रानडुक्कर,रानकुत्रे यांचा समावेश आहे. अशातच चंद्रपुर, मूल, बल्लारपूर, गोंडपीपरी, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, विशेष करून सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. यात मात्र वनविभाग व वनमंत्री मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून मोकळे होतात. मात्र हल्ले रोखण्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना करत नाहीत.
आज आपण जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. मात्र वाघाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभाग व वन प्रशासन कोणतेही ठोस पावले उचलत नाही. उलट वाघाच्या हल्ल्यात दिवसेंदिवस नागरिकांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे आता तरी वनमंत्र्यांनी चंद्रपुर जिल्ह्याकडे लक्ष देऊन वाघाचे हल्ले रोखावे व ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी उलगुलान समघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.