साडे सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ मनसेच्या लढ्याला यश : राजू कुकडे यांची पत्रपरिषदेत माहिती
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
चंद्रपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ दिला. मात्र, साफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने ६ लाख ५६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात राज ठाकरे यांची भेट घेऊन व्यथा मांडली. सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. टेमुर्डा येथे रास्तारोको आंदोलन केले. अखेर नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मनसेच्या लढ्यामुळेच हे यश मिळाल्याचे राजू कुकडे यांनी सांगितले.
या कर्जमाफीत वरोरा तालुक्यातील ३ हजारावर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबविली. परंतु, या योजनेतसुद्धा या तीन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. पर्यायाने या शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नव्हते. अनेक शेतकऱ्यांचे बँक खातेही जप्त करण्यात आले होते. त्यामुळे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत आपबिती सांगितली. वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कर्जमाफीकडे त्यांचे लक्ष वेधले. अखेर शासनाने हिवाळी अधिवेशन साडे सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कर्जमाफी करतानाच २०१७ पासूनची व्याजमाफीही करण्यात यावी, अशी मागगी यावेळी राजू कुकडे यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेल जनहित कक्ष विभागाचे सुनील गुढे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, विजय तुर्क्याल, भादुजी गिरसावळे,बाळकृष्ण पाकमोडे, सीताराम देठे, विलास खडसंग, तुळशीराम वैद्य, प्रभाकर खारकर, गजानन खारकर, शामराव सरोवर, रामभाऊ चौधरी, रामदास गजभे, पावडे उपस्थित होते.